Friday, November 2, 2012

प्रिय अतिरेक्क्यांनो...

Posted by Unknown


प्रिय अतिरेक्क्यांनो...

मारून मारून मारलं किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़ण्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्र्यांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे

कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते

तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने छक्के नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कळुन चुकल्या आहेत
झाडल्या गोळ्या ,फोडले बोंम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज काढुन टाका
तुम्ही आम्हाला गुलाम कराल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हणत
तिरंग्याला सलाम कराल !!
जय हिन्द…….. जय महाराष्ट्र……




©अनोळखी

1 comment: